प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे ते बोलतात. कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही. त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्याबरोबर सरकारी, सहयोगी असतील. महाराष्ट्रात जे घडले त्याबाबत लोकांत जागृती केली पाहिजे. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोक मोठी होऊ शकत नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. दरम्यान, पक्षाने दखल घेतली नाही. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यामुळे लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

हेही वाचा- ‘…तर मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल” ; धनंजय मुंडेचं विधान!

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या आंदोलनाची खिल्ली उडवत त्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आम्ही आंदोलन करत नाही. तसेच कोण काय बोलले याकडेही लक्ष देत नाही. प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे बोलतात. त्याला मी फारसे महत्व देत नाही.

हेही वाचा- “…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”; शिवरायांचा संदर्भ देत संभाजीराजे छत्रपतींचा ‘जशास तसे उत्तर’ देण्याचा इशारा

इतका आवाज उठवूनही पक्षाकडून दखल घेतली जात नाही, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष मोठा होऊच शकत नाही. त्यांनी दखल घेतली नाही. पण, लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल. कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही, त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही टप्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, असं उदयनराजे म्हणाले.
जे घडलंय त्याविषयी लोकांना सांगितले पाहिजे. यात कोणतेही राजकारण नाही. पण, येथील लोकप्रतिनिधी म्हणतात राजकारण करत आहेत. छत्रपतींचा अवमान होत असेल या वाड्यात मलाच काय त्यांनाही व इतर कोणालाच राहण्याचा अधिकार नाही. घराण्याचे नाव लावतात, मात्र करणार काहीच नाहीत. जे काय राजकारण करायचे ते करु देत त्यांना. पण, आम्हाला लेाकांची सेवा आणि समस्या सोडवायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच वाटचाल करणार आहोत, असे उदयनराजे यावेळी ते म्हणाले.