भाजपाला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातल्या प्रचार सभेत केलं होतं. १३ नोव्हेंबरच्या दिवशी अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं. ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनीही मध्य प्रदेशच काय देशातल्या सगळ्या नागरिकांना रामभक्तांना रामाचं मोफत दर्शन भाजपाने घडवलं पाहिजे अशी मागणी केली. राज ठाकरेंना या वक्तव्याबाबत जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरेंनी आपल्या शैलीत अमित शाह आणि भाजपाला टोला लगावला.

अमित शाह यांनी काय आश्वासन दिलं?

मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शाह म्हणाले, “तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल.”

mayur mundhe quits bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या ‘त्या’ भाजपा कार्यकर्त्याची पक्षाला सोडचिठ्ठी; दिलं ‘हे’ कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
tamil nadu cm mk stalin appointed his son udhayanidhi as deputy chief minister
अन्वयार्थ : घराणेशाही कालबाह्य!
Balasaheb Thorat
महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीस यांनी ठरवावे’; बाळासाहेब थोरात यांना १८० जागा जिंकण्याचा विश्वास
nagpur bhaskar jadhav
“लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….
Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

“मला वाटतं भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडलं आहे. तुम्ही काय कामं केली? ते लोकांना सांगा ना. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष कशाला लोकांना दाखवत आहात? सत्तेत तुम्ही इतकी वर्षे आहात तर काय कामं केली ते सांगा.” असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपा आणि अमित शाह यांना टोला लगावला आहे.

विश्वचषक भारताने जिंकणं हे लोकसभेच्या रणनीतीचा भाग आहे का? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले “छे हो, अहो चंद्रयान विसरले लोक. विश्वचषक कसा लक्षात ठेवतील? लोकसभा निवडणुकींना अद्याप अवकाश आहे. तोपर्यंत वर्ल्डकप वगैरे विसरतील लोक.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.