धाराशिव : धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला गुरूवारी रात्री वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे धाराशिव तालुक्यातील इर्ला, भंडारवाडी, दाऊदपूर व तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, अणदूर, खुदावाडी या परिसरातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. कुठेही जीवितहानी झाली नाही. मात्र बागायती पिके, घरांचे नुकसान होवून आर्थिक हानी झाली आहे. तर झाडे व पत्रे पडून जनावरे जखमी झाले आहेत.

हेही वाचा >>> ‘दुष्काळ आढावा बैठकीला मराठवाड्याचेच मंत्री गैरहजर’; शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याची..”

traffic closed on 15 roads in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमधील १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
Water in Ambazari Lake overflows due to heavy rains Nagpur
अंबाझरी तलावातील पाणी ‘ओव्हरफ्लो’ पातळीपर्यंत
Khadakwasla dam and bhide bridge
Video : “भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुणेकरांचा पावसाळा सुरु होत नाही”; खडकवासल्याचे दरवाजे उघडले; नदीपात्राचा रस्ता बंद
Thane, traffic jams, potholes, Kapurbawdi, Manpada, Kharegaon Toll Naka, Mumbra Bypass, crane, Kapurbavdi flyover, internal roads, Mumbai Nashik highway, long queues, vehicle blockages ghodbunder Road
ठाणेकर कोंडीच्या विळख्यात; घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोंडी
uran bombil fish marathi news
उरण: आगमनालाच बोंबिलाचा भाव कडाडून दोनशे रुपयांवर! पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचे दर वधारून खिशावर भार
tiger
Video: बछड्यांसह वाघीण निघाली ऐटीत….पण, भररस्त्यात असे काही घडले की चवताळून थेट पर्यटकांवर…
vehicles, Queues,
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर वाहनांच्या रांगा, एकाचवेळी वाहने रस्त्यावर आल्याने वाहन कोंडी
How to drive through waterlogged roads during monsoons 5 tips for driving safely through floods
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा

धाराशिव तालुक्यातील इर्ला, दाऊदपूर व भंडारवाडी येथे गुरूवारी रात्री अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पपई, लिंबू, संत्री, केळी अशा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरावरील पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून नुकसानग्रस्त बागा, घरे आणि जखमी जनावरांची पाहणी केली व शेतकर्‍यांशी चर्चा केली. तसेच महसूल प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तुळजापूर तालुक्यातील अणदूर, खुदावाडी, कुन्सावळी, मंगरूळ या भागातही मोठ्या प्रमाणात वादळी वारे होते. पाऊस कमी व वादळी वारे तीव्र स्वरूपाचे असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यालगतची  झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली होती. आमदार पाटील यांनी प्रशासनाला सूचना देवून रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक खुली करून दिली. तसेच नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश धाराशिव व तुळजापूरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> अनंत अमुची ध्येयासक्ती! आईने मुलासह बारावीची परीक्षा देऊन मिळवले ८३ टक्के गुण

मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू

धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील भंडारवाडी, इर्ला, दाऊपूर, मंंगरूळ, अणदूर, खुदावाडी, कुन्सावळी या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि पाऊस झाला. यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच लिंबू, पपई, केळी या बागायती पिकांचेही मोेठे नुकसान झाले आहे. तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्तांशी बोलताना सांगितले.