महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वर्धनगड किल्ला शिवसेनेने दत्तक घेतला आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देत पुन्हा एकदा हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटवण्याच्या दृष्टीने शिवसेना प्रयत्नशील आहे. वर्धनगड किल्ला आगामी काळात एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ निर्माण होण्यासाठी शिवसेना पावले उचलत असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली. दुष्काळी खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावर ग्रामपंचायत वर्धनगड व पुणे-पिंपरी प्राधिकरण तसेच खटाव तालुका शिवसेनेतर्फे शिव वृक्षसंवर्धन अभियान राबवले गेले. त्यात वर्धनगडावर औषधी व लोकापयोगी सुमारे ५ हजार वृक्षांची लागवड व १२ हजार बियांचे रोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नितीन बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, की वर्धनगड हा अभेद्य किल्ला दुष्काळी पट्टय़ात असूनही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज इथे वास्तव्याची नोंद इतिहासात सापडते. राजेश फलके, सरपंच अर्जुन मोहिते, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तुकाराम चव्हाण, अर्जुन कुंभार, शंकर घोरपडे, निसार शिकलगार, संजय घोरपडे, भरत मोहिते, अमोल मोरे, विठ्ठल रोकडे, मुख्याध्यापक डी. एम. मायणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vardhangad fort adopted by shiv sena
First published on: 25-07-2016 at 01:28 IST