देशातील सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम असताना अलीकडे काही वर्षांपासून याच राष्ट्रवादीत गटातटाचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक असो व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक, यात राष्ट्रवादीने केलेल्या हाराकिरीमुळे भाजपने आयताच पुरेपूर लाभ उठविला आहे. राष्ट्रवादीतील हे एकमेकांच्या जिवावर उठलेले राजकारण अर्थात पक्षश्रेष्ठींच्याच प्रेरणेतून होते आहे की काय, याबाबत बरीच पुष्टी मिळू लागली आहे. अर्थात यामुळे एकंदरीत सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीच्या प्रमुख अभेद्य गडांपैकी सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख गड मानला जातो. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय जडणघडण याच सोलापूर जिल्ह्य़ात झाली. पवार हे सत्तरच्या दशकात पालकमंत्री म्हणून सोलापुरात कार्यरत असताना त्यांनी आपल्या ताकदीचा पाया याच जिल्ह्य़ात घातला. पुढे तो अधिकाधिक मजबूत होत गेला. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर सत्ता आता-आतापर्यंत राष्ट्रवादीची. बहुतांश तालुका पंचायत समित्या, नगर परिषदा, काही अपवाद वगळता बहुतांश आमदारही राष्ट्रवादीचेच, शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा दूध संघ, बहुसंख्य साखर कारखाने व अन्य सहकारी संस्थांचे जाळेही राष्ट्रवादीच्या धुरिणांनीच विणलेले. असे असतानाही जिल्हा परिषदेची सत्ता भाजपपुरस्कृत महाआघाडीला थेट आंदणच दिली गेली. राष्ट्रवादीने एवढे औदार्य होण्याचे कारण तरी काय, याचा थोडासा जरी कानोसा घेतला म्हणजे जिल्हा परिषदेत भाजपपुरस्कृत अध्यक्ष व्हावा, ही राष्ट्रवादी श्रेष्ठींचीच इच्छा दिसून येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijaysinh mohite patil ncp
First published on: 29-03-2017 at 01:59 IST