औरंगाबादजवळील गेवराई तांडा परिसरात एका महिलेने दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैशाली रवींद्र थोरात (वय २५), अनुष्का (वय ४) व आयुष (वय २) अशी मृतांची नावे आहेत. तर रवींद्र सुधाकर थोरात, असे वैशालीच्या पतीचे नाव आहे, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली आहे.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले आहेत. रमाईनगरमध्ये मृत वैशालीचे माहेर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman commits suicide with two children due to family dispute msr
First published on: 15-04-2021 at 21:07 IST