अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघंही लवकरच एका चित्रपटातून बऱ्याच वर्षांनंतर एकत्र  काम करणार आहे. आठ वर्षांनंतर दोघंही एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या  चित्रीकरणाला सुरूवातही झाली आहे. यानिमित्तानं अभिनेषकनं नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानधनातील तफावतीविषयी अभिषेकनं आपलं मत मांडलं आहे.

महिला अभिनेत्रींना अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधन मिळतं यावरून अनेकदा वाद होतात. पण मी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. मी आणि ऐश्वर्यानं ९ चित्रपटात काम केलं. त्यापैकी आठ चित्रपटात माझ्यापेक्षाही अधिक मानधन हे ऐश्वर्याला मिळालं होतं. ‘पिकू’मध्ये सर्वाधिक मानधन मिळालेली व्यक्ती दीपिका पादुकोन होती, या इण्डस्ट्रीत कलाकार किती यशस्वी आहे यावरुन त्याचं मानधन ठरतं. जर नवोदीत कलाकार शाहरुखइतकंच मानधन मागत असेल तर त्याला ते कसं मिळणार? असा सवालही अभिषेकनं विचारला आहे.

मानधनातील तफावत या मुद्द्यावर पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन त्यानं दिला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी अनुराग बसुच्या ‘गुलाबजामुन’  चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.