बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दीपिका-रणवीरचं लग्न नुकतंच झालं असून सध्या कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये या लग्नाची चर्चा सुरु आहे. या चर्चांमध्ये आता भर पडत आहे ती क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची. विरुष्काच्या लग्नाला पुढील महिन्यात १ वर्ष पूर्ण होत असून त्याच धरतीवर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

विरुष्काचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘मान्यवर’ या ब्रॅण्डचा असून विराट आणि अनुष्का मान्यवरचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. मागील वर्षी या ब्रॅण्डचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता लग्नानंतरचं आयुष्य कसं असतं यावर आधारित आणखी व्हिडिओ सादर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

Celebrating love everyday #SaathSaathHamesha @manyavarmohey @virat.kohli

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विराट व अनुष्का नेहमी एकमेकांची साथ सोडणार नाही, असे वचन देताना दिसले होते. तर आता आलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या एका वर्षानंतर नात्यातील गोडवा कसा असतो हे दाखविण्यात आलं आहे.

व्हिडिओमध्ये विराट व अनुष्का एका लग्नात पोहचतात व एकमेकांबद्दल तक्रारी करतात. मात्र नात्यात कितीही कटूता असली तरी प्रेम हे कायम असतं असं म्हणतं आयुष्याच्या शेवटापर्यंत दोघे सदैव एकत्र राहणार असल्याचं म्हणतात. या व्हिडिओमध्ये विरुष्कामधील प्रेम दिसत असून लग्नानंतरही त्यांचं आयुष्य याच पद्धतीने सुरु असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच गाजत आहे.