‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं करोनामुळे निधन झालं. दिव्याच्या निधनामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दिव्याची मैत्रिण व अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिव्याच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

“एकदा नात्यात फसवणूक झाली की दुसऱ्यांदा चूक करण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यावेळी जो कोणी व्यक्ती खांदा देतो त्याच्यासोबत मुली पुन्हा नातं जोडतात. दिव्या खूपच निरागस होती. मी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. मी तिचा पती गगन गब्रूबद्दल बोलतेय. त्या व्यक्तीने दिव्याचा शारीरिक व मानसिक छळ केला. दिव्याने स्वीकारावं यासाठी त्याने विनवणी केली आणि तिच्या या निर्णयामुळे मी चार वर्षे तिच्यापासून लांब होते”, असं देवोलिना या व्हिडीओत म्हणाली.

Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

दिव्या आणि गगन यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. शिमलामध्ये गगनविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जामिनावर सुटल्याचा खुलासाही देवोलिनाने केला. “तू पुन्हा कारागृहात जाशील. कारण तू दिव्याचा अतोनात छळ केलास. देव तुला कधीच माफ करणार नाही”, असं ती म्हणाली.

दिव्याला करोना व न्युमोनिया यांचं निदान झालं होतं. गेल्या आठवड्यापासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी तिने अखेरचा श्वास घेतला.