‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०१७’ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच सहभागी झाली होती. अभिनेत्री आणि करिअरमध्ये फार लवकर निर्माती बनण्याच्या तिच्या यशाला ती सक्षमीकरणाचा प्रवास मानते. ‘इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्ह २०१७’ मधील ‘सेटल फॉर मोअर’ या सत्राची सुरुवात तिने सक्षमीकरणाचा संदेश देऊन केला. तिच्या या संदेशामध्ये, तिचे ज्या पद्धतीने संगोपन करण्यात आले याचाही उल्लेख केला.

अनुष्का म्हणाली की, ‘लहानपणी तुमचे संगोपन कसे होते त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तुमच्यावर झालेल्या संस्कारांवरच तुमचे व्यक्तिमत्व बनत असते. जसे आपण मोठे होत जातो तसे आपल्यावर केलेल्या संस्कारांचे महत्त्व आपल्याला कळू लागते. त्या संस्करातूनच आपले विचार घडत असतात आणि आपला मित्र-परिवार बनत असतो.’ सक्षमीकरणाबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली की, सत्याच्या बाजून उभे राहणे हेही तुम्ही सक्षम असल्याची निशाणी आहे. काही चुकीचं घडत असेल तर त्याला नकार दिलाच पाहिजे.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनुष्का तिच्या आगामी सिनेमाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असून, विविध कार्यक्रमांना ती मोठ्या उत्साहात हजेरी लावत आहे. ‘फिल्लौरी’ या सिनेमात अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज, सुरज शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात अनुष्का चक्क एका भटकत्या आत्म्याच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.