यशराज फिल्म्सचा ‘ठग’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे. त्यात मुख्य अभिनेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक अभिनेत्यांचा विचार या सिनेमासाठी केला जात आहे. सुरुवातीला यशराज फिल्म्सकडून हृतिक रोशनच्या नावाची वर्णी लागलेली. पण आता मात्र या सिनेमासाठी आमीर खानचा विचार करण्यात येणार आहे. हृतिकला पसंती असताना अचानक त्याला या सिनेमापासून का वगळण्यात आले याचे कारण अजून कळले नसून सिनेवर्तुळात सध्या ठगमध्ये नवीन अभिनेता कोण याचीच चर्चा होत आहे.
सुरुवातीला हृतिक रोशनशी या सिनेमाविषयी बोलण्यात येत होते. मात्र, त्याने दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांच्याकडे ६० कोटी रुपयांचे मानधन मागितले. एकाच अभिनेत्याला ६० कोटी रुपये मानधन देणे आदित्य चोप्रा याला थोडे जास्तच वाटले. हृतिकशी मानधनाला घेऊन वाटाघाटी करण्याचा प्रयत्नही करण्यात आले होते. पण हृतिक मात्र मानधनाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायला तयार नाही असेच दिसते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान हे मानधनाच्या बाबतीत निर्मात्यांना परवडणारे कलाकार आहेत. मात्र, हृतिकने एकट्यानेच ६० कोटी रुपये मागितल्यावर मात्र आदित्यला तो ठगमध्ये असण्यावर पूर्नःविचार करावा लागला. जर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर त्यातला काही भाग हा अभिनेत्यालाही मिळत असतो. त्यामुळे ६० कोटी रुपये मानधन हे कोणत्याही निर्मात्याला विचार करायला लावणारीच रक्कम आहे नाही का?
पण, एवढी मोठी रक्कम मागण्यामागचे कारण तरी काय असेल. तर या सिनेमाचे कथानक एवढे दर्जेदार आहे की बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची चांगलीच धूम होईल अशी हृतिकला खात्री आहे. पण, अधिक रक्कम मागितल्यामुळे मात्र त्याचे ठगसाठीची दारं बंद होऊन ती आता आमीर खानसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे अती हाव ही केव्हाही वाईटच…