कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातला वाद कधीच शमणार नाही हे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडल्यानंतर कपिलने सुनीलला ट्विटरवरुन अनफॉलो केलं. पण आता फक्त सुनीललाच नाही तर शोमधील नानीला अर्थात अली असगर आणि चंदन प्रभाकरलाही त्याने ट्विटरवरुन अनफॉलो करत त्यांचे शोमध्ये परतण्याचे दरवाजे बंद केले आहेत.

कपिल आणि सुनीलमध्ये झालेल्या वादानंतर सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करण्यास नकार दिला होता. सुनीलसोबत अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनीही या शोमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. कपिलने या प्रकरणानंतरही अनेकदा सुनीलची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यात फारसे यश आले नाही, शेवटी कपिलने सुनीलला ट्विटरवरुन अनफॉलो करुन या वादावर त्याच्यापरीने पूर्णविराम द्यायचे ठरवले असेच म्हणता येईल. या कार्यक्रमात नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे कपिलला आता नानीची आणि चायवाल्याची गरज नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. म्हणूनच त्याने आता अलीला आणि चंदनलाही ट्विटरवरुन अनफॉलो केले आहे.

ali-asgar-celebrating-his-birthday

या कलाकारांनी शो सोडण्यामुळे शोच्या टीआरपीवर फार मोठा परिणाम झाला होता. पण तरीही कपिलचा शो हा सुनीलच्या शोपेक्षा टीआरपीमध्ये पुढेच आहे. ‘इंडियल आयडॉल’चा अंतिम एपिसोड ज्या दिवशी प्रदर्शित झाला होता, त्याच दिवशी ‘द कपिल शर्मा शो’चा एपिसोड प्रदर्शित झाला होता. या दिवशी कपिलच्या शोचाच टिआरपी सर्वात जास्त होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी चॅनल आता सुनीलसाठी नवीन शो काढण्याच्या तयारीत आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सुनील लाइव्ह शो करण्यामध्ये व्यग्र आहे.

ali-asgar