छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अनेकदा प्रेक्षक या मालिका पाहत असताना त्यात समरसून जातात. यातलीच एक मालिका म्हणजे ‘जीव झाला येडापिसा’. कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेल्या या मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळे या मालिकेने आज इतक्या भागांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळेच मालिकेच्या सेटवर कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केलं.

‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेची सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळातच शिवा आणि सिद्धी यांच्यातील वाद प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यानंतर या दोघांमधील वाद हळूहळू कमी होत त्यांच्यात प्रेमाचं नातं फुलू लागलं. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष भावली. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी केलेल्या या प्रेमामुळे या मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

मालिकेचे ५०० भाग झाल्यामुळे सेटवर संपूर्ण टीमने या दिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. केक आणू सगळ्यांनी पार्टी केली. तसंच प्रेक्षकांचे आभारदेखील मानले. दरम्यान, सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सिद्धी लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या या मालिकेतील अनेक रंगतदार वळणं प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.