छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत गेली १२ वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली असल्याचे समोर आले. पण नेहाने मालिका का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला होता. एका मुलाखतीमध्ये नेहाने मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच नेहाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मालिका का सोडली हे सांगितले आहे. नेहाचे मालिकेचे निर्माते असदी मोदी यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी ते ‘तुला मालिका करायची असेल तर कर नाहीतर सोडून दे’ असे म्हणाले असल्याचे नेहाने सांगितले.

यापूर्वीही नेहाने तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता असे म्हटले जात होते. या चर्चांवर उत्तर देत नेहा म्हणाली, ‘या सगळ्या अफवा होत्या. मी आधी ही मालिका सोडण्याचा विचार केला नव्हता आणि मालिकेच्या निर्मात्यांसोबत माझे चांगले नाते आहे. तुम्हाला इंडस्ट्रीचा नियम माहिती आहे काम करायचे असेल तर करा नाही तर सोडून द्या.’

‘मी असिद मोदी यांचा सम्मान करते. मी त्यांना म्हणाले आपण सर्व गोष्टींवर बोलायला हवे. पण त्यावेळी तुम्हाला कोणी असे म्हणत असेल की, तुम्हाला तुमचा इगो सांभाळायला हवा. तुम्हाला मालिका सोडून जायचे असेल तर जाऊ शकता. आमच्याकडे या भूमिकेसाठी दुसरी कोणती तरी अभिनेत्री आहे. ती मालिकेच्या भूमिकेसाठी कमी मानधन घेणार आहे. हे कोणासोबतही घडू शकते. त्यामुळे मी आता या गोष्टीचा फार विचार केला नाही’ असे नेहाने पुढे म्हणाली.