स्टार प्रवाह वाहिनीच्या 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रुपानं एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचं होणारं लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देतो. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास तयार होते. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्चाचं उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे. वाचा : 'क्राईम पेट्रोल'चा हा बहुचर्चित अभिनेता करणार संजय दत्तसोबत काम 'शतदा प्रेम करावे' या मालिकेतल्या नाट्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 'शतदा प्रेम करावे'चा महाएपिसोड रविवारी, १७ जूनला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.