प्रेमाला भाषा नसते, जात नसते, धर्म नसतो … असते ती फक्त भावना …. आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगलांचं अख्ख आयुष्य एकवटलेलं असतं.  झी युवावर  २७ फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता एक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारी मालिका सुरु होत आहे. “प्रेम हे ” प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्या प्रत्येकासाठी ही मालिका आहे. प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेच कठीण असते, असे म्हटले जाते. तरीही प्रेम करणारे प्रेम करतच राहतात.  प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत. त्या व्यक्तिसाठी मनाला पटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते आणि कुठच्याही कारणाने आपल्या आवडत्या व्यक्तिला गमवावं लागलं तर मात्र ही गोष्ट आपल्यासाठी  खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकते. प्रेमाच्या अश्या असंख्य भावना अनेकांच्या मनात धुमसत असतात. शहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण भागात आजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत. याच विषयाला धरून “प्रेम हे” या मालिकेची पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत “.  एका गावात राहणारे सुनील आणि राधिका  (वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान) , एकमेकांवर प्रेम तर करतात पण त्यांच्यासाठी व्यक्त होणं तितकसं सोपं नसतं. मग त्यांना जोडणारी आणि त्यांच्यातील प्रेम फुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं “रुपेरी वाळूत …”  आणि या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणार पण अव्यक्त प्रेम आणि याचबरोबर त्यांच्या प्रेमात आडवं येतं घर, समाज , गाव.

प्रेम म्हणजे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विनलेलं नातं असत. जे मनात असतं ते शब्दात मांडता येत नाही. अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तिला केवळ पाहण्यात जीवनाचा अर्थ लागतो पण ती व्यक्ती आपली व्हावी ही भावना मनमोकळेपणाने तिलाही न सांगू शकणारे अनेकजण आपल्याला अनेक ग्रामीण भागात सापडतात. दोन जिवांचे मधूर मीलन म्हणजेच  प्रेम असतं. पण त्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न करण तेवढच महत्वाच असत. असे अनेक तरुण असतात की जे आपल्याला काय आवडतं त्याही पेक्षा तिला काय आवडतं हे महत्वाचं मानतात आणि तिच्या नकळत, ते तिला मिळवून देण्यासाठी धडपड करतात. या भावनेतही  प्रेमचं असतं.

writer madhugandha kulkarni
“चित्रपट बेभरवशाचा धंदा पण, मालिकांमध्ये…”, लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितला दोन्ही माध्यमातील फरक, म्हणाली…
pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
ipl 2024 will ms dhoni play in ip 2025 or not one word from suresh raina made everything clear ipl viral video
धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही? जिवलग मित्र सुरेश रैना एकाच शब्दात म्हणाला…; पाहा VIDEO
spruha joshi sukh kalale and tejashri pradhan premachi gosht between connection
तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, जाणून घ्या…

tejashree-vaibhav

झी युवावरील “प्रेम हे ” या मालिकेतील पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत “.  ग्रामीण भागातील अव्यक्त प्रेम भावना अधोरेखीत करणारी ही गोष्ट असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिगदर्शन  संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी ही कथा लिहिली आहे.  समीर पेणकर यांचे सवांद आणि पटकथा आहे . “प्रेम हे” या मालिकेचे संगीत निलेश मोहरीर यांनी केले असून हृषिकेश रानडे आणि केतकी माटेगांवकर यांनी शीर्षक गीत गायले आहे .