लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडले. यावेळी बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर मतदान केल्यानंतरचा फोटो पोस्ट करत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेही मतदानाचा हक्क बजावल्यानंतर फोटो पोस्ट करत ट्विट केलं. पण या ट्विटमुळेच तो सध्या ट्रोल होतोय. 'तब्बल एक-सव्वा तास सामान्य नागरिकाप्रमाणे लाईनीत घामाघूम अवस्थेत उभं राहून सामान्य नागरिकाचा पहिला हक्क बजावून आलोय! मतदान करुन आल्याचा आनंद काही वेगळाच,' असं ट्विट पुष्करने केलं आहे. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक सर्वांनीच रांगेत उभं राहून मतदान केलं पाहिजे असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. तर सेलिब्रिटींना रांग न लावता थेट मतदान करण्याची संधी देऊ नये अशी भूमिका नेटकऱ्यांनी मांडली आहे. हा कुठला युक्तिवाद नवीनच म्हणजे तुम्ही जे आहात ते तुम्ही मोठं काही तरी केल्या सारख काय सांगताय तो तुमचा च अधिकार जसा प्रत्येकाला असतो त्यात इतकं काही नाही — जिवलगा RAVI (@IamRv9) April 30, 2019 या असामान्य लोकांवर अन्याय झाला आहे. — हवालदार मामा (@pankya_G) April 30, 2019 हे सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभा राहून मतदान केलं म्हणजे काय कोणाला आहेर केला काय? तुमचं हे एक कर्तव्य आहे मग तो कोणता नट असो किंवा राजकारणी त्यात एवढं नवल कशासाठी. #लोक_येडे_*क — नितीन✌ (@Ni3_Sonwale) April 30, 2019 या असामान्य लोकांवर अन्याय झाला आहे, अशी उपरोधिक टीकासुद्धा एका युजरने केली. 'हे सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभा राहून मतदान केलं म्हणजे काय? तुमचं हे एक कर्तव्य आहे मग तो कोणता नट असो किंवा राजकारणी त्यात एवढं नवल कशासाठी,' असंही एकाने म्हटलं. देशावर उपकार झाले ! — SACHIN (@sachinrajani) April 30, 2019 मतदानाच्या दिवशी अनेक सेलिब्रिटी रांग न लावता थेट मतदान करण्यास जातात आणि सामान्य नागरिक मात्र तासनतास रांगेत उभे राहतात. त्यामुळे सर्वांना समान संधी दिली पाहिजे, असं नेटकऱ्यांचं मत आहे.