गेल्या काही दिवसांपासून ‘सैराट’ चित्रपटातून महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु चर्चेत आहे. या चर्चा तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’मुळे रंगल्या आहेत. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना रिंकू आणि चिन्मयने बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.

पाहा त्यांची पूर्ण मुलाखत-

या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘मेकअप’ चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे.  हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.