बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता पाच महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेते शेखर सुमन वारंवार प्रतिक्रिया देत होते. एक दिवस चमत्कार होईल अन् सुशांत प्रकरणातील सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अवश्य पाहा - हा ठरला २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय शो; 'दिल बेचारा' आणि 'मिर्झापुर'लाही टाकलं मागे A lot of ppl I meet keep asking me wat's happening to Sushant's case and I say, I wish I had the answer. Apart from hoping and praying that a miracle will happen one day, there is nothing else you can do.#CBIArrestSSRKillersNow — Shekhar Suman (@shekharsuman7) December 2, 2020 अवश्य पाहा - अभिनेत्याला मिळाली बॉम्बने घर उडवण्याची धमकी; एका फोनने उडाली खळबळ "गेल्या काही काळात मी अनेक लोकांना भेटलोय. प्रत्येक जण मला सुशांत प्रकरणाविषयी विचारतोय. पण खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे याबाबत काहीच उत्तर नाही. देवाकडे प्रार्थना करणं हा एकच मार्ग सध्या आपल्याकडे आहे. पण मला खात्री आहे एक दिवस नक्की चमत्कार घडेल अन् या प्रकरणातील सत्य बाहेर येईल." अशा आशयाचं ट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. There is absolutely no update in the channels have all vanished.There is no discussion anywhere by anyone.6 months down d line we r fighting a desolate battle.i go off the radar now n then bcoz I'm angry that nothing is happening. — Shekhar Suman (@shekharsuman7) November 29, 2020 बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ही शक्यता सीबीआयने फेटाळून लावली आहे. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या आत्महत्येच खरं कारण समोर येईपर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरुच राहील.