भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एखादी मालिका बंद करण्याचे आदेश दिल्याचे समोर आलेय. गेल्या अनेक आठवड्यांपासून वादविवाद आणि याचिकांच्या गराडयात सापडलेली ‘पहरेदार पिया की’ ही ‘सोनी एण्टरटेन्मेन्ट’ वाहिनीवरील मालिका बंद करण्याचे आदेश स्मृती इराणी यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. शुक्रवारी या मालिकेचा शेवटचा भाग दाखविण्यात आला.

वाहिनीने म्हटलेय की, ‘२८ ऑगस्ट २०१७ पासून ‘पहरेदार पिया की’ मालिका टेलिव्हिजनवर बंद करण्यात आली. या मालिकेविषयी घेण्यात आलेला निर्णय त्यासाठी काम करणाऱ्या सर्व टीमसाठी निराशाजनक असून, त्यांची मेहनत वाया गेल्याची आम्हाला जाणीव आहे. यापुढे आम्ही प्रेक्षकांना स्वारस्य असलेल्या मालिका आणण्यावर लक्ष केंद्रित करू. या मालिकेतील कलाकार, निर्माते, प्रेक्षक यांचे आम्ही आभारी असून यापुढेही तुमचा पाठिंबा आमच्या आगामी मालिकांना मिळू देत.’

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

काही आठवड्यांपूर्वीच प्रेक्षकांनी ही मालिका बंद करण्यासाठी याचिका दाखल केलेली. १० वर्षांचा मुलगा एका १८ वर्षांच्या मुलीसोबत लग्न करतो यावर ‘पहरेदार पिया की’ मालिका आधारित होती. हे लग्न प्रेमामुळे किंवा तडजोड म्हणून होत नाही. तर केवळ त्या मुलीने शेवटचा श्वास घेत असलेल्या मुलाच्या वडिलांना दिलेल्या वचनामुळे ती त्याच्याशी लग्न करते. त्या मुलाची मी सदैव ‘पहरेदारी’ (रक्षण) करेन असे वचन तिने दिलेले असते.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

‘बीसीसीसी’ने दोन आठवड्यांपूर्वीच ‘सोनी’ वाहिनीला या मालिकेची वेळ बदलण्याचे आदेश दिलेले. तसेच, ही मालिका बालविवाहाचा प्रसार करत नाही, अशी पट्टीही चालविण्यास सांगितलेले. त्याप्रमाणे वाहिनीने मालिकेची वेळ १०.३० ची केलेली. पण, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अचानक आलेल्या या नोटीसमुळे वाहिनीला खूप मोठा झटका बसला आहे.