मंदार देवस्थळी दिग्दर्शित 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंत या मालिकेमध्ये अनु आणि सिद्धार्थच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार आले. त्यांचं लग्नदेखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालं. त्यातच सान्वीने तिचं कट-कारस्थान सुरु केलं आहे. मात्र या साऱ्यामध्ये आता अनु-सिद्धार्थच्या नात्यामध्ये नवं वळण येत आहे. त्यांच्या नात्यामध्ये नवं प्रेम खुलताना दिसत आहे. या दोघांचं लग्न झाल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये रोज कोणतं ना कोणतं वादळ येतच आहे. सान्वीदेखील कटकारस्थान रचत आहे. मात्र या साऱ्याला दोघंही खंबीरपणे समोरे जात आहेत. त्यातच या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. सान्वीमुळे अनु आणि सिध्दार्थमध्ये काही काळासाठी दुरावा आला होता आणि त्या दरम्यान अनुला तिच्या प्रेमाबद्दलची जाणीव होण्यास सुरूवात झाली. मालिकेमध्ये नुकतीच अनुने तिच्या प्रेमाची कबुली सिध्दार्थला दिली आहे. सिध्दार्थ आणि अनुच म्हणालं तर जरा वेगळं आहे, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणी, अनेक गैरसमज आले. पण आता या दोघांचे नाते अजून दृढ होणार आहे. अनु - सिध्दार्थच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाच्या या सरी कुठलं नवं वळणं घेऊन येतील हे लवकरच कळेल.