आपल्या खेड्यातील लोकांना दळणवळणाचा सोपा मार्ग मिळावा यासाठी एकट्याने डोंगर पोखरून रस्ता तयार करणाऱय़ा ‘माऊंटन मॅन’ दशरथ मांझी या युवकावर समर्पित असा आपला संवेदनशील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा ‘सत्यमेव जयते – २’ शो चा पहिला भाग असल्याचे आमिरने मांझी परिवाराला भेट दिल्यानंतर सांगितले होते. परंतु, पहिला भाग वेगळ्याच विषयावर भाष्य करणारा दाखविल्यामुळे मांझी परिवार आणि गावकरी नाराज झाले आहेत.
गेहलूरमधील गावकरी म्हणाला की, आमिर खानने मांझी परिवाराला भेट देऊन ‘सत्यमेव जयते-२’ चा पहिला भाग दशरथ मांझी समर्पित असेल असे वचन दिले होते. त्यासाठी आम्ही २ मार्च रोजी सर्व गावकरी गावातील एका हॉलमध्ये टेलिव्हिजनवर कार्यक्रम एकत्र जमलो होतो. परंतु, पहिला भाग वेगळ्याच विषयावर सादर करण्यात आला त्यामुळे गावकरी नाराज झाले आहेत. पहिला भाग दशरथ मांझीवर नव्हताच मग, आमिरने तसे वचन का दिले? असा सवालही गावकऱयांनी विचारला आहे.
याबद्दल विचारले असता, सत्यमेव जयते-२ मध्ये दशरथ मांझीवर कोणताच भाग चित्रीत किंवा तसे आयोजन करण्यात आले नसल्याचे स्टार इंडियाचे उदय शंकर यांनी  सांगितले. कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा शेवट मांझीच्या कथेने झाला होता. दुसऱया पर्वाची सुरूवात आम्हाला वेगळ्या विषयाने करायची होती असेही ते म्हणाले.