बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या ‘गोलमाल अगेन’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत असताना तिने ‘नवभारत टाइम्स डॉट कॉम’शी संवाद साधला. यावेळी तिने फक्त सिनेमांबद्दलच नाही तर खासगी गोष्टींवरही भाष्य केले. सकाळी ११ वाजल्या पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सतत सिनेमाचे प्रमोशन केल्यामुळे ती फार दमली होती. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी सकाळपासून एकाच पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन थकले. आता मला परत त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याची अजिबात इच्छा नाही. पण सिनेमाचे प्रदर्शन जवळ येतंय त्यामुळे मुलाखती तर द्याव्याच लागतात. थकलेल्या तब्बूने सुरूवातीला काही प्रश्नांची उत्तरे दिली आणि नंतर स्वतःच पुढील प्रश्न काय येणार हेही सांगू लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मला सगळ्यांनी याच पद्धतीचे प्रश्न विचारले. आता तुम्ही मला माझ्या लग्नाबद्दल विचाराल. मला आता असे वाटू लागले आहे की, सलमान आणि माझ्या लग्नाबद्दलच अनेकांना चिंता आहे. लग्नाबद्दलचे प्रश्न ऐकून मला आता कंटाळा आला आहे. काही तरी वेगळे प्रश्न विचारा.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All are worried about salman khan and my marriage says golmaal actress tabu
First published on: 13-10-2017 at 13:49 IST