महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ‘डेस्टिनी’ या गजल अल्बमचे उद्घाटन केले. तसेच, यातील गजल जरूर ऐकाव्यात असा आग्रही त्यांनी सर्वांना केला आहे.
‘डेस्टिनी’ या अल्बममध्ये अनूप जलोटा, पंकज उदास आणि तलत अजीज या तीन गायकांच्या गजल आहेत. यावर्षातील हा सर्वात मोठा गजल अल्बम असल्याचे समजले जात आहे. अल्बमच्या उद्घघाटनावेळी अमिताभ म्हणाले की, मी हा अल्बम ऐकल्यावर मला फार शांती मिळाली. मी तुम्हा सर्वांना खास आग्रह करतो की, तुम्ही या अल्बममधील गजल अवश्य ऐका. त्याने तुमच्या मनाला शांती मिळेल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan wants everyone should listen destiny albums gajal
First published on: 07-11-2013 at 02:50 IST