महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतेच 'डेस्टिनी' या गजल अल्बमचे उद्घाटन केले. तसेच, यातील गजल जरूर ऐकाव्यात असा आग्रही त्यांनी सर्वांना केला आहे.'डेस्टिनी' या अल्बममध्ये अनूप जलोटा, पंकज उदास आणि तलत अजीज या तीन गायकांच्या गजल आहेत. यावर्षातील हा सर्वात मोठा गजल अल्बम असल्याचे समजले जात आहे. अल्बमच्या उद्घघाटनावेळी अमिताभ म्हणाले की, मी हा अल्बम ऐकल्यावर मला फार शांती मिळाली. मी तुम्हा सर्वांना खास आग्रह करतो की, तुम्ही या अल्बममधील गजल अवश्य ऐका. त्याने तुमच्या मनाला शांती मिळेल.