मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या वाढतानाच त्यात बदलत्या समाजाचेही भान आहे व तेच भान मराठी चित्रपटाचा आशय व सादरीकरण यामधील दर्जा कायम ठेवूनच पुढील वाटचाल होईल असा विश्वास चित्रपट संमेलनात व्यक्त करण्यात आला. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात संवाद या संस्थेच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संमेलनातील ‘मराठी चित्रपटाचा बदलता प्रवाह ‘ या परिसंवादात विविध पद्धतींनी मांडला. राज काझी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. यामध्ये वर्षा उसगावकार, मृणाल कुलकर्णी, दिलीप ठाकूर, महेश कोठारे, अरुणा अंतरकर व गजेन्द्र अहिरे यांनी सहभाग घेतला.
दीड तास रंगलेल्या या परिसंवादात मराठी चित्रपटाची जाहिरात तर होते पण प्रसिद्धी होत नाही , त्यात कल्पकतेचा अभाव जाणवतो, तसेच कसदार कथा हा मराठी चित्रपटाचा कणा असला तरी मराठीतही चित्रपटांना गर्दी खेचणारे स्टार आहेत. सोशल मिडियात मराठी चित्रपट प्रसिद्धीत रस घेत असला तरी त्यावरील विक्रमी लाईक्सप्रमाणेच प्रेक्षक देखील लाभावेत , या व्यवसायात येण्यापूर्वीच चित्रपट हे माध्यम व व्यवसाय म्हणून नेमके काय आहे हे जाणून घ्यावे अशाही अनेक गोष्टींवर मुद्देसूद चर्चा झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitrapat sammelan varsha usgaonkar mrunal kulkarni discussion on marathi movies
First published on: 10-05-2018 at 16:42 IST