हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि रिमेक केलेल्या चित्रपटांच्या जोडीला येणारे वाद हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन गोष्ट नाही. ‘लक्ष्मीबॉम्ब’, ‘कबीर सिंग’, ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटांच्या रिमेकच्या वेळेस वाद उद्भवले आहे. आता ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या रिमेकवरूनही वाद उद्भवला आहे. ऐंशीच्या दशकातील अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. अनिल श्रीदेवीचा रोमान्स, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत, जावेद यांच्या लेखणीतून साकारलेली गाणी, उत्तम पटकथा आणि अमरीश पुरीच्या मोगॅम्बोने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली होती. गेल्या एक-दोन वर्षांपासून मिस्टर इंडिया या चित्रपटाचा रिमेक होणार याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू होती. मध्यंतरी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विटरवर टाकलेल्या अनिल कपूर सोबतच्या छायाचित्रामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला. या निमित्ताने शेखर-अनिल ही दिग्दर्शक अभिनेत्याची जोडगोळी पुन्हा एकदा दिसणार असल्याचा कयास प्रेक्षकांमध्ये बांधला जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता चित्रपटाच्या रिमेकवरून नवीन वाद उद्भवला आहे. मिस्टर इंडिया चित्रपटाचे हक्क निर्माते बोनी कपूर यांनी झी स्टुडियोजला विकले होते. झी स्टुडियोज दिग्दर्शक अली अब्बास जफर बरोबर या चित्रपटाचा रिमेक करत आहे. या संदर्भात फेब्रुवारी महिन्यात दिग्दर्शक अली अब्बास जफरने ‘झी स्टुडियोज सोबत मि. इंडियाच्या दुसऱ्या भागावर काम करण्यास उत्सुक असून सध्या कथेवर काम सुरू आहे. त्यामुळे कलाकाराचे नाव निश्चित झाले नाही,’ असे ट्वीट केले होते. त्यामुळे या वादाने नवीनच वळण घेतले. या चित्रपटाचा रिमेक करताना मला कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्याचे बोनी कपूर यांचे म्हणणे आहे. या कारणावरून झी स्टुडियो आणि बोनी कपूर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over the remake of the movie mr india zws
First published on: 08-03-2020 at 04:28 IST