नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान आंदोलन करणारे शेतकरी पिझ्झा खात असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या टीकाकारांना आता अभिनेता दिलजीत दोसांज याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जेव्हा शेतकरी विष घेत होते तेव्हा कुठे होता? असा सवाल त्याने विरोधकांना केला आहे. अवश्य पाहा - 'शेतकरी पिझ्झा का खावू शकत नाही?'; ट्रोलर्सला स्वरा भास्करचा संतप्त सवाल "शाबास, जेव्हा शेतकरी विष घेत होते तेव्हा तुम्हाला कसलीच चिंता नव्हती अन् आज पिझ्झा खाल्ला तर थेट ब्रेकिंग न्यूज झाली." अशा आशयाचं ट्विट करुन दिलजीतनं ट्रोलर्सला रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील टीकाकारांना असंच जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. अवश्य पाहा - बेरोजगारीमुळे निराश झालेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न Shaa Baa Shey Badaa Didh Dukheya Tuadha Hain ? pic.twitter.com/u16Ti96AlN — DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 14, 2020 अवश्य पाहा - "हॅण्डल विथ केअर नाहीतर."; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा शेतकरी आंदोलन आणखी पेटणार! केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होत आहे. आज आंदोलनाचा १७ दिवस होता मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने, शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढच नाहीतर आता आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्याचा इशाराही एकप्रकारे देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकरी संघटनांचे नेते एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार असल्याचे संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितले आहे.