देशात राजकीय पक्ष दंगली घडवून आणून दुफळी निर्माण करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. देशाची सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायची याचा हक्क संविधानाने दिला. त्याकरिता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. तरच आपल्या मनातील राज्य येईल, असे प्रतिपादन अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील विविध प्रांतांतून नगरमध्ये स्थायिक झालेल्यांनी भारत भारती या संस्थेची स्थापना केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने भारतमाता पूजन, देशभक्तिपर व्याख्यान, फुड फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम आयोजित केले होते. त्याला थंडीतही मोठा प्रतिसाद मिळाला. निवृत्त मेजर जनरल एस. पी. सिन्हा व संस्कार भारतीचे कोकण विभागाचे अध्यक्ष अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी भारत भारतीचे संस्थापक संयोजक विनय पत्राळे हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दामोधर बठेजा, उपाध्यक्ष राजू लक्ष्मण, राजेंद्र अग्रवाल, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे उपस्थित होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not fall prey to political parties promises says vikram gokhale
First published on: 29-01-2019 at 15:42 IST