राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला बांधून हातात तलावर घेऊन शत्रूशी लढणारी वीर रणांगणा. याच लढवैय्या आणि धाडसी राणीची कथा अभिनेत्री कंगणा रणौत रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाता ट्रेलर, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर यामधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मणिकर्णिका…’मधील ‘भारत ये रहना चाहिए’ हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यातून देशाप्रतीचं प्रेम म्हणजे काय असतं हे स्पष्टपणे जाणवत आहे. ‘देश से है प्यार तो, हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए.’ असे बोल असलेलं हे गाणं प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी शब्दबद्ध केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manikarnika song bharat released kangana ranaut
First published on: 16-01-2019 at 13:24 IST