आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अशी अमृता सुभाषची ओळख आहे. आज तिचा वाढदिवस आहे. गेली अनेक वर्षे ती नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं.

‘झी ५’ने आयोजित केलेल्या एका पुरस्कार समारंभात अमृताला ‘सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अमृता सुभाषला प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मनोज बाजपेयी यांनी अमृताचं तोंडभरून कौतुक केलं.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण

आणखी वाचा : बहुप्रतीक्षित वेब सीरिज ‘असुर सीझन २’ बद्दल मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

अमृता सुभाषने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज म्हणाले, “अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अभिनयाप्रती असलेले तिचे प्रेम, जिद्द चिकाटी यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी अमृताचा ‘किल्ला’ हा चित्रपट पाहिला तेव्हापासूनच मी तिच्या कामाचा चाहता झालो. मला तिचं काम खूप आवडतं, हा पुरस्कार देण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे.”

पुरस्कार घेतल्यानंतर अमृतानेही उपस्थित असलेल्या लोकांचे आणि तिच्या करीअरमध्ये योगदान देणाऱ्या लोकांचे मनापासून आभार मानले. याबरोबरच मनोज बाजपेयी यांनी केलेलं कौतुक ऐकून तिला फारच बरं वाटलं हे तिने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलं. मनोज यांचा ‘झी ५’वर ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे अन् त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.