इतिहासात डोकावून पाहिलं तर मानवाने नदीकाठी आश्रय घेतला आहे. सिंधू संस्कृती याचं उत्तम उदाहरण आहे. आजही या संस्कृतीचे अवशेष सापडताना दिसून येतात. आज अनेक शतकं होऊन गेली तरी सिंधू नदी वाहतच आहे. अनेक पिढ्या या नदीकाठी होऊन गेल्या आहेत. आज भारतातील प्रमुख शहरात किंवा शहराच्या आसपास एखादी नदी आहेच. नदी आणि मानवी नाते संबंध यांची उत्तम गुंफण बांधणारा अभिनेता जितेंद्र जोशीचा गोदावरी चित्रपट नक्कीच आपल्याला अंतर्मुख करायला लावतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटक, मालिका वेबसीरिज यामाध्यमातून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या जितेंद्र जोशीने या चित्रपटात निर्माता, अभिनेता गीतकार अशा तिन्ही भूमिका पार पडल्या आहेत. चित्रपटाची कथादेखील नदीप्रमाणे संथ जाणारी आहे, नदीकाठी एका वाड्यात राहणारे कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह हा नदीकाठी असणाऱ्या त्यांच्या मालकीच्या दुकानांमधून भाडेस्वरूपात पैसे जमा करणे. वर्षानुवर्षे देशमुख कुटुंब ही परंपरा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे येत असते. यात प्रत्येक पिढीत होणार संघर्ष, नव्या पिढीचा जितेंद्र जोशी अर्थात निशिकांत हे पात्र ज्याची देशमुख कुटुंबात होणारी घुसमट, नदी, परंपरा, आस्तिकपणा याबद्दलची टोकाची भूमिका, यामुळे त्याने साकारलेले पात्र सतत कुठल्यातरी प्रश्नात अडकलेले दाखवण्यात आले आहे. घरात होणाऱ्या घुसमटीमुळे तो आपल्या कुटुंबाला सोडून वेगळा राहत असतो. रुक्ष स्वभाव असलेल्या निशिकांतचा वडिलांबरोबरचा अबोला मात्र स्वतःच्या मुलीसाठी बायकोसाठी असलेला एक हळवा कोपरा यातून त्याच्या स्वभावाचे कंगोरे दाखवण्यात आले आहेत. सगळं सुरळीत चालू असताना एक घटना निशिकांतच्या आयुष्यात घडते आणि त्याचे मनपरिवर्तन घडून येते. चित्रपटात त्याला भेटणारी माणसं वेगळा दृष्टीकोन देऊन जातात. अखेरीस त्या पात्राचा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे प्रवास सुरु होतो.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of marathi film godvari which shows human relationship and tradition spg
First published on: 09-11-2022 at 18:19 IST