तुम्हाला वळू हा सिनेमा आठतोय का? वळू सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील घरात ओळखीचा झालेल्या त्या सिनेमातील बैलाचा मृत्यू झाला आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या ‘वळू’ सिनेमात या बैलाची ‘डुरक्या’ नावाची भूमिका होती. सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत राजा नावाने हा बैल ओळखल्या जाणाऱ्या या राजाने याच संस्थेत अखेरचा श्वास घेतला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ सिनेमातील डुरक्या या बैलाचे पात्र तुफान लोकप्रिय झाले होते. या बैलाच्या जोरावर या सिनेमाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अने पुरस्कार मिळवले होते.

अन् पंडित अभिषेकी एकाएकी गायब झाले- अशोक पत्की

Firefighters have been without pay for four months
मुंबई : अग्निशमन दलातील जवान चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित
five people drown in bhavali dam including four from the same family
नाशिक : भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू ; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश
Increase in dengue cases in the state in last five years Mumbai
गेल्या पाच वर्षांत राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; मात्र मृत्यूच्या संख्येत घट
10th Board Exam Topper Heer Ghetiya Dies
१० वीला ९९.७० टक्के मिळवणाऱ्या हीरचा निकालानंतर चार दिवसातच मृत्यू; वडिलांचा निर्णय वाचून मन हळहळेल
arrest Class XI student elopes with her father friend in Nagpur
अकरावीच्या विद्यार्थिनीचे वडिलांच्या मित्रासोबत पलायन; अपहरणकर्त्याला गोंदियातून अटक
A young man died in a two wheeler accident mumbai
दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
10-Year-Old Dies After Consuming Maggi
‘मॅगी’सह भात खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबातील इतरांनाही विषबाधा
Asthma deaths in india
विश्लेषण : जगातील ४६ टक्के दमा मृत्यू भारतात… दम्याच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय आवश्यक?

तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, जाडजूड शिंगे अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतील होता. तब्बल तीनशे वळूंमधून दिग्दर्शकाने राजाची निवड केली होती. मागील काही वर्षांपासून त्याची सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत देखभाल केली जात होती. अनेक गाई, वासरे यांच्यासह काही भाकड जनावरासोबत तो या संस्थेत राहत होता. मात्र, आजारपणामळे वृद्ध झाल्याने या बैलाचे निधन झाले.

१७-१८ वर्षे गाठलेल्या या वळूने मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे खाणे-पिणे सोडले होते. यामुळे त्याचे वजन दोनशे किलोंपर्यंत घटले होते. राजा वृद्ध झाल्याने उपचारास हवी तशी साथ मिळत नव्हती आणि अखेर त्याची प्राणज्योत मालवली. पांजरपोळ संस्थेत गरजणारा भारदस्त आवाज हरपला. या संस्थेचे या बैलावरील प्रेम त्याच्या मरणानंतरही कमी झाले नाही. म्हणून तर या संस्थेने राजाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात अतुल कुलकर्णी, मोहन आघाशे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.