|| रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूप्रदेश कुठलाही असला तरीही मानवी नातेसंबंधांची वीण तीच असते. चाळीसेक वर्षांपूर्वी नाटककार महेश एलकुंचवार यांनी विदर्भातील धरणगावकर देशपांडे या जमीनदार कुटुंबातील नातेसंबंधांचं आणि बदलत्या काळाबरोबर होणाऱ्या ऱ्हासाचं हृदयस्पर्शी, तितकंच वास्तवदर्शी चित्रण ‘वाडा चिरेबंदी’ नाटय़त्रयीमध्ये केलं होतं. अगदी तशाच तऱ्हेचं चित्रण लेखक-दिग्दर्शक-नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार आणि पाश्र्वसंगीतकार अशा ‘सब कुछ’ भूमिकेतील प्रदीप वैद्य यांनी ‘काजव्यांचा गाव’ या नाटकात केलेलं आहे. फक्त माती बदलली आहे. विदर्भाऐवजी कोकणच्या तांबडय़ा मातीत हे नाटक घडतं, इतकंच. ‘काजव्यांचा गाव’ बघताना ‘वाडा..’ मनाच्या पाश्र्वभागी सतत निनादत राहतं. याचं कारण ‘वाडा’तले अनेक संदर्भ जवळजवळ जसेच्या तसे इथंही समांतरपणे आलेले दिसतात. म्हणजे गावाकडे मागे राहिलेला भाऊ, शहरात राहणाऱ्या भावाला तो एकटाच गावचं उत्पन्न खातोय असं वाटणं, ‘वाडा’मध्ये जशी उपेक्षित धाकटी बहीण प्रभा आहे, तशीच इथंही शांता आहे (मात्र, शांता थोडीशी वेगळी आहे. तिला ‘स्व’चं भान आहे. आणि ती खंबीरपणे उभी आहे!). इथे शहरातला मोठा भाऊ परस्परच घरचा सागवान विकतो. गावातील धाकटय़ाला या गोष्टीचा पत्ताच नसतो. ‘वाडा’मध्ये अभय परदेशी जातो, इथं एक बहीण प्रतिभा ‘स्व’च्या शोधार्थ अमेरिकेला गेली आहे. ‘वाडा’त आप्पाजींचं निधन झाल्याने सगळे जण एकत्र आलेत, तर इथं आईच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सारे एकत्र आलेत. परंतु भावाभावांतील भांडणामुळे उद्वेगग्रस्त झालेली आई अचानक जाते. तिच्या पश्चात वाटणी करण्यावरून भावंडांत बेबनाव उभा राहतो. ‘वाडा’प्रमाणेच इथंही पुढच्या पिढीतील चुलत-आत्ये-मामे भावंडांचं एकमेकांत छान गूळपीठ आहे..

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi natak
First published on: 19-05-2019 at 00:09 IST