‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. करोनाबाधित झाल्यानंतर त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. गेल्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पत्नी उमा ताम्हाणे यांचेही १९ एप्रिलला करोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांचे कु टुंब असा परिवार आहे. नाटककार-अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते भाऊ होत.

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकाचे लेखन-निर्मिती शेखर यांनी केली होती. त्यांचे ‘तू फक्त हो म्हण’ हे नाटकही गाजले होते. ‘तिन्ही सांज’ हे नाटक अलीकडेच प्रदर्शित झाले होते, यात काही वेगळे तंत्रप्रयोगही त्यांनी केले होते.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Kiritkumar Shinde Resigns From MNS
कीर्तिकुमार शिंदेंचा मनसेला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांचं..”
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी