जनुकीय तंत्रज्ञानसिद्ध (जीएम) बियाणे किंवा एकांकुर (बीटी)  प्रकारातील कापूस, वांगे यांचे बियाणे यांविषयी शेतकऱ्याचे म्हणणे काय? शेतकरीवर्गाची भूमिका काय? ती भूमिका प्रसारमाध्यमांना ऐकू येते का? माध्यमांतून तिचे प्रतिबिंब उमटते का आणि तेही सर्व भाषांत सारखेच उमटते का? की ‘जीएम’ आणि ‘बीटी’विषयीची चर्चा शेतकऱ्यांच्या भाषेत निराळी आणि धोरणकर्त्यांच्या भाषेत निराळी असते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला कोणते तंत्रज्ञान हवे हे ठरवण्यात भारतीय शेतकऱ्यांची भूमिका किती महत्त्वाची असते? हा प्रश्न ‘जीएम’ (जेनेटिकली मॉडिफाइड) पिकांना सरकारकडून मिळणाऱ्या परवानगीसंदर्भात खूपच महत्त्वाचा आहे. कारण आत्तापर्यंत ज्या एकमेव पिकाला सरकारने लागवडीसाठी परवानगी दिली त्या ‘बीटी कापसा’चा स्वीकार शेतकऱ्यांनी झपाटय़ाने केल्यानंतरदेखील त्याचा सरकारच्या पुढील निर्णयप्रक्रियेवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. उलट २०१० साली आपल्या सर्व नियामक व्यवस्थांच्या चाचण्या पार केलेल्या बीटी वांग्याला पूर्णत: राजकीय कारणांनी सरकारने परवानगी नाकारल्यानंतर नव्या जीएम पिकांना परवानगीची प्रक्रिया पूर्णत: खंडित झाली. केंद्रात नव्याने आलेल्या मोदी सरकारने जुन्या सरकारचेच धोरण जोरकसपणे राबवले. बीटी वांग्यावरील बंदी तर उठवली नाहीच उलट जीएम मोहरीलादेखील राजकीय कारणास्तव बंदी घातली.

मराठीतील सर्व माती, माणसं आणि माया.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bt and genetically modified seeds impact on farmers
First published on: 25-07-2018 at 01:01 IST