मुंबई : राज्य सरकारने तीन महिन्यांमध्ये सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डेटा) जमा करून ओबीसींना आरक्षण द्यावे, अशी मागणी भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा भाजपने दिला आहे. राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. पण हा अधिकार राज्य सरकारला नसून आयोगाचा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारला पुढे ढकलता येणार नाहीत. संविधानातील तरतुदींनुसार घ्याव्या लागतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.