‘हिट अँड रन’ खटल्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून सलमानचा तत्कालीन सुरक्षारक्षक हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही साक्ष ग्राह्य़ धरता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सलमानला सगळ्या आरोपांतून मुक्त केले आहे. अपघात घडला तेव्हा सलमान मोटार चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता, अशी साक्ष रवींद्र पाटील यांनी न्यायालयात दिली होती. त्यानंतर ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्र पाटीलचे नैराश्यामुळे आणि क्षयरोगामुळे निधन झाले.

‘रवींद्र पाटील यांची साक्ष निर्थक,

एफआयआर दाखल
रवींद्र पाटीलनेच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल होता. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये तो कार्यरत होता. त्याचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा पोलीस दलातच कार्यरत होते.
ल्लएकमेव साक्षीदार
रवींद्र हा या प्रकरणातील महत्त्वाचा आणि एकमेव साक्षीदार होता. त्याने वांद्रे कोर्टात सलमानने जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला. त्या वेळी तो मद्य प्यायलेला होता आणि आपण त्याला त्याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
ल्लदबाव वाढला
रवींद्र पाटीलने साक्ष दिल्यानंतर त्याच्यावरचा दबाव वाढला होता. तो न्यायालयात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायलाही घाबरत होता. त्याच्यावरच्या वाढत्या दबावामुळेच त्याला नराश्याने घेरले.
ल्लपोलिसांचीच भीती
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रवींद्रला नोकरीवरून काढले होते. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्यामुळे रवींद्रच्या नराश्यात आणखीनच भर पडली. त्याने मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
ल्लकुटुंबही दुरावले
मुंबई सोडल्यानंतर रवींद्र अनेकदा लपूनछपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा सल्ला दिला होता, पण रवींद्रने त्यांचे ऐकले नाही.
ल्लसाक्ष बदलण्यासाठी दबाव
रवींद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी त्याच्यावर खूप जास्त दबाव होता, परंतु त्याने
शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष
बदलली नाही. कुठलीही लाच त्याने स्वीकारली नाही की त्याने धमक्यांनाही भीक घातली नाही.
ल्लअनुपस्थितीवरून अटकही
सलमान खान प्रकरणात न्यायालयात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला तुरुंगात धाडण्यात आले. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगत रवींद्रने आपल्याला तुरुंगात सराईत गुन्हेगारांपासून दूर ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती, पण त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
ल्लभीक मागण्याची वेळ
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रवींद्र बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचे सांगितले जाते.
ल्लदारू आणि क्षयरोगाने बळी
रवींद्र २००७ मध्ये शिवडी पालिकेच्या रुग्णालयात सापडला. अतिमद्यपानामुळे त्याला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नव्हता. अखेर याच रुग्णालयात त्याने ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. या वेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपकीही कोणीही उपस्थित नव्हते.
ल्लसाक्ष व्यर्थ!
रवींद्र पाटीलच्या मृत्यूनंतर २०१४ साली सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ‘हिट अँड रन’ खटला सत्र न्यायालयात सुरू झाला. त्या वेळी सत्र न्यायालयाने रवींद्रने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे रवींद्रला मृत्यूनंतर का होईना न्याय मिळाला, असा एक मतप्रवाह होता. उच्च न्यायालयाने याप्रकरणी रवींद्रने दिलेली साक्ष ग्राह्य़ धरण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्याने सतत साक्ष बदलल्याने त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या रवींद्रची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले. अखेर साक्षी-पुराव्यांअभावी सलमानवर कोणतेही आरोप न लावता त्याची मुक्तता करण्यात आली.