लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनासमोरील माती अमृत कलशाद्वारे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा भवनासमोरील मातीचा अमृत कलश स्वीकारण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने थेट राज्यपालांना पत्र पाठविले आहे.

ugc allows colleges universities to admit students
विद्यापीठात घेता येणार वर्षातून दोनदा प्रवेश, विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा? निर्णयामागील कारण काय?
Take precautions in the wake of NEET results Union Home Ministry advises
नीट निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचना
neet Controversial verdict case
NEET वादग्रस्त निकाल प्रकरण : वीस हजार विद्यार्थ्यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव
Students of the state will get free residential training and subsistence allowance of UPSC
राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘यूपीएससी’चे मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता, २८ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत…
Mumbai university marathi news
पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडला; मात्र ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
ugc caste discrimination marathi news
शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या घटना किती? युजीसीने मागवली माहिती…
Pimpri Chinchwad Municipal Corporation, pcmc halts DBT Scheme, School Supplies Switches to Supplier Tender, pimpri news, school news,
पिंपरी : महापालिकेचा ‘डीबीटी’ला हरताळ!
pune university, Drug Scandal, Drug Scandal at Savitribai Phule Pune University, Yuva Sena Demands Immediate Action, Yuva Sena Demands Immediate Action, drugs in pune university
विद्यापीठात सापडले अंमली पदार्थ… कारवाई का नाही? युवा सेनेचा सवाल

आणखी वाचा-मुंबई: प्लास्टिक विरोधात कारवाई वेगवान; महानगरपालिकेच्या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी

रखडलेल्या निकालामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागतो, तर काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया जाते. परंतु तरीही अनेक आव्हांनांवर मात करीत विद्यार्थी आपला निकाल प्राप्त करतात आणि विविध क्षेत्रात योगदान देतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आठवण म्हणून छात्रभारती विद्यार्थी संघटना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोरील माती अमृत कलशाद्वारे राज्यपालांपर्यंत पोहोचवणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी सदर अमृत कलश स्वीकारून ‘माझी माती, माझा देश’ या अभियानासाठी राजधानी दिल्लीत न्यावा, अशी विनंती छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे.