संदीप आचार्य

मुंबई : राज्यात रस्त्यावर कुठेही अपघात झाल्यास ‘बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजने’अंतर्गत ७२ तास मोफत औषधोपचार करण्याचा निर्णय होऊनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून अधांतरीच आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला ३० हजार रुपये खर्चापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार होते. तब्बल आठ वर्षांपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आली होती तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र आजपर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

union budget 2024 live updates july 23 finance minister of india nirmala sitharaman presents budget in lok sabha
Budget 2024 : करसमाधानाचा वेध; नवीन प्रणाली स्वीकारणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना सवलती!
navi Mumbai md drug, navi Mumbai md marathi news, mephedrone drug navi Mumbai , 2 crore md drug seized navi Mumbai
दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त… नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई…
Mumbai fake gold fraud marathi news
मुंबई: बनावट सोने बँकेत गहाण ठेऊन १.३८ कोटींची फसवणूक, आरोपीला अटक
Record volume of supplemental demands Demands of around one lakh crores for various schemes print politics news
पुरवणी मागण्यांचे आकारमान विक्रमी? विविध योजनांसाठी सुमारे एक लाख कोटींच्या मागण्या
Government Enhances Health Services, Government Enhances Health Services for Ashadhi Vari Pilgrims, 80 Lakh Worth Medicine Procurement, 80 Lakh Worth Medicine Procurement Ashadhi Vari Pilgrims, marathi news,
आषाढी वारीसाठी ३,८० लाख रुपयांची औषध खरेदी, स्थानिक स्तरावर तातडीने खरेदी करण्यास मान्यता
Benefit for women up to 65 years for Majhi Ladki Bahin Yojana extended till 31st August
‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील अटी शिथिल; ६५ वर्षांपर्यंत महिलांना लाभ, ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
applications for crop insurance
एक रुपयात पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी १०० ते २५० रुपयांची मागणी; ई-सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट?
Aditya Thackeray
“अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

 योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणीच ठोस पुढाकार घेताना दिसत नसल्याने ही योजना कागदावरच दरवर्षी सरकत राहते असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यकाळात २०१६ मध्ये प्रथम बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला होता.  मात्र आजपर्यंत आरोग्य विभाग या योजनेची अंमलबजावणी करू शकलेला नाही.

त्यानंतर अल्पकाळ आरोग्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्या काळातही या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे प्रस्तावित असलेली अपघात विमा योजनेची रखडपट्टी सुरूच आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या योजनेचा आढावा घेऊन आगामी अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्याचा मनोदय व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना अस्तित्वात येईल तेव्हाच याबाबत बोलता येईल, असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

योजनेचे स्वरूप

 राज्यातील महामार्गावरील अपघातांची मोठी संख्या लक्षात घेऊन जखमी रुग्णांना तात्काळ मदत मिळावी यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा आठ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. महामार्गालगत ट्रॉमा केअर सेंटर तसेच जखमींना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अंतर्गत एकूण ७४ प्रकारच्या उपचार प्रक्रियांसाठी ३० हजार रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले होते.