ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती'', असे ते म्हणाले. नवी मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या 'तडीपार मोर्चा'त सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हेही वाचा - “…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला! काय म्हणाले भास्कर जाधव? “गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा मागितली नाही. मी माझा शेतीचा व्यवसाय करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझ्या मुंबईतील आणि गावातील घरी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काढलं असावं”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. हेही वाचा - भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यानंतर विनायक राऊतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “यापुढे जर कोणी…” “असे हल्ले करून तुम्ही मला शांत करू शकत नाही. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी बोलत राहणार. ईडी, सीबीआय, पोलिसांचे छापे, एसीबीचे छापे, पक्ष फोडून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून तुम्ही विरोधी पक्षातील बोलणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असाल, तर निश्चितपणे मला मारा. मात्र, मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला धक्का, ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’ होणार “नारायण राणेंच्या मोठ्या कार्ट्याने माझ्या दिवंगत वडिलांबाबत, माझ्या पत्नी आणि मुलांबाबत अपशब्द वापरले. आज ते आम्हाला सुसंस्कृत राजकारण शिकवत आहेत. खरं तर राज्याच्या सुसंस्कृत राजकीय परिस्थितीला कोणी तिलांजली दिली असेल, तर या तीन राणेंनी दिली आहे.”, असा आरोपही त्यांनी केला.