मुंबई : राज्यातील मोठय़ा प्रमाणातील मराठी भाषिकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी दुकानांवर मराठी पाटय़ांची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्यच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. महाराष्ट्रात व्यापार करायचा तर सरकारच्या एकसमानता लादण्याच्या निर्णयाचे त्यांनी पालन करायलाच हवे, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. मराठीच्या अस्तित्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यापारी संघटनेला न्यायालयाने यावेळी २५ हजार रुपये दंडही सुनावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुकानांवरील मराठी पाटय़ांच्या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मराठी भाषा मरणासन्न झाली आहे. मराठी शाळा बंद होत आहेत. त्यामुळेच आता व्यापाऱ्यांवर मराठी पाटय़ांची सक्ती करण्यात येत असल्याचा आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सक्ती केली जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. राज्य सरकारने स्वत:च्या वापरासाठी मराठी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली आहे. परंतु सरकार आपल्या नागरिकांवर विशिष्ट भाषेची सक्ती करू शकत नाही, असा दावा संघटनेतर्फे करण्यात आला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court rejects plea against marathi sign boards on shops in maharashtra zws
First published on: 24-02-2022 at 00:20 IST