संजय बापट, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजावर वारंवार ओढवणाऱ्या संकटामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीत (२०२२-२३ ते २०२५-२६) या कालावधीसाठी भरीव वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र केंद्रावर विश्वास ठेवून राज्यातील शिवसेना- भाजप सरकारने यापूर्वीच आपत्तीग्रस्तांसाठी वाढीव मदत देण्याचा घेतलेला निर्णय आता सरकारच्या अंगाशी आला आहे. केंद्राने मदतनिधीत केलेली वाढ ही राज्याच्या सध्याच्या मदतीपेक्षा कमी असल्याने वाढीव मदतीचा मोठा आर्थिक भार आता दरवर्षी सरकारच्या खांद्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central financial help in natural calamities less than state government zws
First published on: 26-02-2023 at 02:19 IST