भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यातील इंदू मिलची साडेबारा एकर जागा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा आहे. बाबासाहेब हे एका समाजाचे नव्हे तर सर्वाचेच नेते होते. त्यामुळे या निर्णयाचे राजकारण करून श्रेय लाटण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिपाई नेत्यांना हाणला आह़े
ते बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलत होत़े या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. या जागेवर कोणतेही व्यावसायिक बांधकाम होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये – मुख्यमंत्री
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यातील इंदू मिलची साडेबारा एकर जागा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा आहे.
First published on: 06-12-2012 at 05:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not try to take credit chief minister