ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत असेल तर माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंच्या याच आव्हानावर आता एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत भाष्य केले आहे. मी अशी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हानं स्वीकारतो. अशी आव्हानं स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे. सहा महिन्यांपूर्वी मी असेच एक आव्हान स्वीकारले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते वरळी येथे जाहीर सभेत बोलत होते.

हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”

Nagpur ncp leader anil Deshmukh
अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान; म्हणाले,”माझ्याकडे पेन ड्राईव्ह, हिंमत असेल तर क्लिप…”
Poet Narayan Surve
नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने मारला डल्ला, नंतर चिठ्ठी लिहून परत केली वस्तू; म्हणाला, “मला माहीत नव्हतं..”
Manoj Jarange Patil devendra fadnavis
“तुमची चार माकडं…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल; थेट नामोल्लेख करत म्हणाले…
Devendra Fadnavis
“कोणाला बोलायची खुमखुमी…”, फडणवीसांनी शिंदे-पवारांसमोरच महायुतीच्या प्रवक्त्यांना खडसावलं; नेमका रोख कोणाकडे?
eknath shinde vidhansabha speech
“ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले, त्यांना ‘लाडकी बहीण’ काय कळणार?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!
What Uddhav Thackeray Said About Rahul Gandhi?
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलाच नाही, भाजपा खोटं नरेटिव्ह…”
Owaisi sensational claim Tipu Sultan
ओवैसींचा खळबळजनक दावा “संविधानावर टिपू सुलतानचा फोटो, वल्लभभाई पटेलांची सही, भाजपाने तिरस्कार…”
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : अन्नदाता म्हणायचे, पण हमीभाव द्यायचा नाही

“आम्ही तेव्हा गुवाहाटीमध्ये होतो. काही लोक म्हणाले यायचं तर वरळीतू येऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे अगोदर एकटाच आला. त्यानंतर हेलिकॉप्टरने न जाता वरळीतून रस्त्याने गेला. कारण आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहोत. आम्हाला आयतं मिळालेले नाही. आम्ही मेहनत केलेली आहे. शाखाप्रमुखापासून मी काम केलेले आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत आलोले आहोत. आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तुम्ही कोणाला आव्हान देता. ही आव्हानं पेलत पेलतंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही लोकांच्या मनातील सरकारची स्थापना केलेली आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्र, वरळी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले; “हिंमत नसेल तर…”

“काही लोक सकाळी उठले की गद्दार आणि खोके असे शब्द वापरतात. या शब्दांशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही. मी त्याच्यावर भाष्य करत नाहीत. काही लोक आव्हान देत आहेत. पण मी माझ्या सहकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की, एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हानं स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं,” असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता दिले.