ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधात निवडणूक लढण्याचे थेट आव्हान दिले आहे. शिंदे वरळीतून लढण्यास तयार नसतील, तर मी ठाण्यातून लढतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. या आव्हानानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झालेला आहे. असे असतानाच आता एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. याच कार्यक्रमात भाजपाचे नेते नितेश राणे यांनीदेखील दमदार भाषण केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे.

हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”

Sharad Pawar criticizes Amit Shah regarding violation of law
‘भ्रष्टाचाराचा सुभेदार ’ म्हणणारे गृहमंत्री कायद्याचे उल्लंघन करणारे तडीपार;  शरद पवार यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार
Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
Jitendra Awhad, Eknath shinde, Jitendra Awhad give statement about Eknath shinde, funds distributio, Jitendra Awhad criticise ajit pawar, thane news, latest news,
तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे होते, अजितदादांनी मला हरविण्याचा प्रयत्न चालवला; जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Nobody will be spared in run and hit case says Chief Minister Eknath Shinde
“रन अँड हिट प्रकरणात कोणालाही पाठीशी घेतली जाणार नाही…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांबरोबर तलाठ्यांकडून अरेरावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा; म्हणाले…

“आज मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचा (७ फेब्रुवारी) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आज आपण उपस्थित राहून सर्वांनी आम्हाला प्रेम दिले आहे. आमच्या सरकारवर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर तुम्ही विश्वास दाखवत आहात. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच त्यांच्या स्थानिक आमदार मुलाला हा सत्कार घेता आला असता. शेवटी हे सगळं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं. कर्तृत्व लागतं. आपल्या स्वत:च्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची आपल्यात ताकद नसेल, हिंमत नसेल तर ती आमदारकी फक्त मिरवायला ठेवली आहे का?” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीदेखील आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरेंवरही टीका केली. “आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. तुमचे हात स्वच्छ असतील तरच आमच्याशी संघर्ष करा. मुंबईकरांवर अन्याय करून तसेच तुमचे हात रक्ताने माखलेले असतील, तर आमच्याशी संघर्ष करण्याची भाषा करू नका,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

“आता मुंबईकरांना न्याय देणारं सरकार आहे. आज संवेदनशील सरकार आहे. तुमचा आशीर्वाद एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठेवा. मुंबईचे सर्व प्रश्न आम्ही पुढील पाच वर्षांत सोडवल्याशिवाय राहणार नाही,” असे आश्वासनही आशिष शेलार यांनी दिले.