गोराई ते नरिमन पॉईंटपर्यंत कोस्टल रोड प्रकल्प अजेंड्यावर असून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, मुंबईला पूर्व किनारपट्टीदेखील आहे याची कल्पनाही काही जणांना नाही. मुंबईच्या पूर्व सागरी किनारपट्टीवर ९११ एकर जागा अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकते. त्या जागेवर बीपीटी सारखा प्रकल्प राबवता येऊ शकतो.” तसेच त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
महालक्ष्मी येथील रेसकोर्स जागेवरील भूमिकेबाबत बोलत असताना, सर्वानुमते रेसकोर्स मुंबईच्या बाहेरही हलवता येऊ शकतो आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरील उद्यान उभारता येऊ शकेल असा मानस असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच उद्यानाचा आराखडाही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2014 रोजी प्रकाशित
गोराई ते नरिमन पॉईंट कोस्टल रोड शिवसेनेच्या अजेंड्यावर- उद्धव ठाकरे
गोराई ते नरिमन पॉईंटपर्यंत कोस्टल रोड प्रकल्प अजेंड्यावर असून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
First published on: 20-06-2014 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gorai to nariman point coastal road project is top most priority says uddhav thackeray