इंग्रजांचं मुघलांशी वितुष्ट आल्यावर औरंगजेबाच्या सिद्दी या सरदारानं मुंबईवर हल्ला केला व मुंबई आपल्या हुकुमाखाली आणली. इंग्रजांवर मानहानीकारक अटी लादत तह झाला पण सिद्दी काही मुंबईतून काढता पाय घेत नव्हता. शेवटी रुस्तमजी या पारशी गृहस्थाच्या नेतृत्वाखाली भंडारी व कोळी लोकांनी मिलिशिया उभारला ज्यांनी सिद्दीला मुंबईतून हाकललं. पहिलं अँग्लो इंडियन वॉर किंवा मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर. 'गोष्ट मुंबईची' या मालिकेतील हा भाग कसा वाटला जरूर कळवा. त्याचबरोबर ‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.