डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळणारा जनसागर आणि शीवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी उभारलेला चौथरा या पाश्र्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत सर्व पोलीस ठाण्यांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, चैत्यभूमीकडे होणारी गर्दी लक्षात घेऊन वीर सावरकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी या प्रकरणी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनाप्रमुखांच्या चौथऱ्याभोवती सुरक्षा कडे उभारण्यात आले आहे. याशिवाय चैत्यभूमीच्या मार्गावर बंदोबस्ताची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. सर्व पोलिसांना मध्यरात्रीपासूनच सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबईत सर्वत्र अतिसावधानतेचा इशारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळणारा जनसागर आणि शीवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी उभारलेला चौथरा या पाश्र्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत सर्व पोलीस ठाण्यांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
First published on: 06-12-2012 at 05:51 IST
TOPICSप्रोटेक्शन
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High alert in all over mumbai