स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावला होता. मात्र, १५ ऑगस्टनंतर याच राष्ट्रध्वजाचा अवमान होताना दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून इंडियन ऑइलच्यावतीने राष्ट्रध्वज संकलन मोहीम राबवण्यात येत आहे. वापरात नसलेले ध्वज जवळच्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश जारी केले” CM एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेत दावा, म्हणाले…

mumbai heatwave alert marathi news,
मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
The election commission rejected the Thackeray group reconsideration petition regarding the campaign song
‘जय भवानी’वरील बंदी कायम; प्रचारगीताबाबत ठाकरे गटाची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Vande Bharat, Tejas Express,
पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार

देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र, १६ ऑगस्टनंतर राष्ट्रध्वचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही राष्ट्रध्वज संकलन मोहीत राबवत आहे. १६ ऑगस्टनंतर जे राष्ट्रध्वज वापरात नसतील, ते राष्ट्रध्वज जवळच्या पेट्रोल पंपवर जमा करावे. जे ध्वज चांगले असतील, ते आम्ही जतन करून आणि उर्वरित ध्वज सन्मानाने नष्ट करू, असे इंडियन ऑईलच्या मुंबई विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील या उपक्रमाबद्दल ट्वीट करत कौतुक केले आहे. “तिरंग्याचा आदर करा, सन्मानाने तो जतन करा, जमत नसेल तर सन्मानाने परत करा,” असे ट्वीट तिने केले आहे.