मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत समितीस अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावर १९ जुलै रोजी दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान या दुर्घटनेस ठेकेदार आयआरबी कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land slide accident inquiry
First published on: 28-08-2015 at 06:43 IST